Skip to main content

Posts

Featured

खुसरो ते करंदीकर via न्यूटन

"छाप तिलक सब छिनी रे मोसे नैना मिलाईके " लिहणारा आमिर खुसरो आणि "रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजणी" लिहणारे संत ज्ञानेश्वर हे समकालीन होते हे लक्षात आलं की मला भारी वाटतं. दोघांचं आयुष्य वेगळं, अनुभव वेगळे आणि दोघांच्या लिखाणाची जातकुळी सुद्धा वेगळी आहे.  पण दोघांचं साहित्य कालातीत आहे.   21 व्या शतकात कुठेतरी एका मशीनच्या code सोबत दिवसा झुंजणारी पोरगी संध्याकाळी उदरभरण करता करता ह्या दोघांना ऐकू शकते... ऐकता ऐकता "व्वा काय भारी लिहलंय" अशी आपसूक मनभरून दाद देऊ शकते याचा अर्थ असा आहे की बाराव्या शतकातल्या माणसांनी जे लिहून ठेवलं ते अजूनही... अ-जू-न-ही तुमच्या भावनांशी कुठेतरी relate करतं. आणि हे लक्षात येणं हा एक रोमांचक अनुभव आहे. अजून एक - जेव्हा शिवाजी महाराज सतराव्या शतकात ईकडे स्वराज्य स्थापनेसाठी लढत होते तेव्हा त्याच वेळी तिकडे युरोपात न्यूटन गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी झटत होता!  भूतकाळातील दोन माणसांनी एकाच वेळी अस्तित्वात असूनही, त्यांचा त्या काळावर खूप मोठा प्रभाव असूनही त्यांना एकमेकांबद्दल काहीच माहित नसणं ही किती मोठी शोकांतिका आहे! आजच्या घ

Latest Posts

नागरिकांचं बिघडलेलं शास्त्र

Cutting chopping वगैरे वगैरे

Adulting

स्वप्नं

डियर डायरी

Engineering चे अवशेष

चहास्वप्नं

सलाम सालेमसाहब

लंडनचे दिवस

Adventure sport